सोगणीला आलेली पिके ही गेली वाहून
न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
रुई निफाड दि.३१ ऑक्टोंबर अजिंक्य जगताप
कोळगाव ता निफाड येथील आसमानी संकटातून वाचलेल्या पिकांना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळया देखद निस्तनाभुत केले गेली चार दिवसांपासून चालु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
निदान आपण केलेल्या खर्चातील पन्नास टक्के तरी आपल्या पदरात पडले अशी अपेक्षा ह्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना होती.
परंतु पावसाने त्यांच्या ह्या अपेक्षा पार धुळीला मिळवल्या आहेत.
आता शेतकरी कमीत कमी झालेल्या नुकसानीची सर्व सामान्यांचे असलेले सरकार दखल घेऊन काही नुकसान भरपाई देईल की सरकार फक्त तोंडाला पाने पुसेल,सोसायटी व राष्ट्रीय कृत बँका कडून घेतलेलं कर्ज व आपल्या मुलीचं धरलेले लग्न ह्याचा विचार करून शेतकरी आता काय निर्णय घेणार? आता तरी देवा —- आमच्या मदतीला धावून येरे हिच आर्द हाक सर्व शेतकरी वर्गातून दिली जात आहे.
लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.
अशी मागणी श्री किरण घोटेकर श्री देवीदास घोटेकर श्री नामदेव घोटेकर यांनी केली आहे.