पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज

मुंबई दि २२ एप्रिल विशेष प्रतिनिधी
पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.
ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून श्रद्धांजली.
आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत दृढ आहोत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्ती साठी प्रार्थना करतो.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार,महाराष्ट्रातील दिलीप दिसले आणि अतुल मोने, हे ३ पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत.

आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत.
काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदारी यांच्याशी फोन करून चर्चा केली आणि सविस्तर माहिती घेतली.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत.
त्यापैकी एक पनवेल येथील माणिक पटेल आणि दुसरा एस.भालचंद्र राव आहे.
सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.