Breaking
महाराष्ट्र

मराठा आंदोलनासाठी विंचूरमधून शिधा 

पिकअप गाड्यांमधून थेट मुंबईकडे रवाना

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर -दि ३१ ऑगस्ट

आंदोलन कर्त्यांच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यावर सोपविण्यात आली असून, त्यानुसार शनिवारी (ता.३०) येवला-लासलगाव मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा बांधवानी घराघरातून भाकरी,चपाती,मिरचीचा ठेचा,भत्त्याची पाकिटे,बिस्किट पुडे,तांदळाचे कट्टे,काकड्या,मिरच्या,पाण्याच्या बाटल्या सकाळी नऊला विंचूर येथे जमा केल्या.हे सर्व साहित्य चार पिकअप गाड्यांमधून थेट मुंबईकडे रवाना करण्यात आले.

मुंबईतील पोषणकर्त्यांसाठी शिधा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घरात समाज बांधवांनी गव्हाचे पीठ देण्यात आले.

पिठापासून चपात्या करून देण्याची जबाबदारी महिलांनी स्वीकारली आहे.

एक भाकरी समाजासाठी’ या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमातून मराठा समाजाची एकजूट व परस्परांवरील आपुलकी प्रकर्षाने दिसून आली.

आंदोलनाला गेलेले बांधव उपाशीपोटी राहू नयेत.

यासाठी महिलांनी “दररोज भाजी-भाकरी पाठवू, पण आपल्या बांधवांना उपाशी ठेवणार नाही” असा निर्धार व्यक्त केला आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे